शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्कच आहे. शासनाने सर्वांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. शिक्षणाचे खरे उद्देश्य विश्व ज्ञान असले तरी त्याचा रोजगाराशी सरळ सरळ संबंध असल्याने एका पातळी पर्यंतचे शिक्षण, आजच्या युगात, जीवनावश्यक झाले आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक शिक्षणासाठी अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण ही बरेच वाढलेय. या सर्वां मागे मेहनत आहे ती खेडोपाडी काम करणाऱ्या शिक्षकांची. आय.टी. आणि संबंधित व्यवसायामध्ये कुशल मनुष्यबाळाची खूप गरज भासते आहे, त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेच्या भरभराटीच्या अजून खूप शक्यता आहेत. तसेच शेती विषयक तांत्रिक ज्ञानही आज असणे आवश्यक आहे कारण, जागतिकीकरणात प्रत्येकाला ह्या स्पर्धेचा भाग व्हावे लागेल. तेंव्हा आपल्याला शेती क्षेत्रात जास्तीत जास्त तांत्रिकीकरण करावे लागेल पण, त्या पूर्वी तेथील मनुष्यबळाला इतरत्र रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने पुढाकार घेऊन अनेक शिक्षण आणि रोजगार विषयक योजना चालवल्या आहेत. या योजनांची महाराष्ट्रातील शेवटच्या स्थारापर्यंत आणि कोपर्यापर्यंत माहिती पोहोचावी या साठी, या विभागात आपल्याला नवीन शिक्षण विषयक योजनांबद्दल आणि रोजगाराच्या नवीन संधींबद्दल माहिती मिळेल. तसेच आपल्या शिक्षण आणि रोजगार विषयक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. मग तो प्रश्न आमच्या गावात शाळा किंवा कॉलेज उघडण्यासाठी काय करायचे? ते मला दहावीला ५५% पडलेत मी कोणता विषय घेऊ ? किंवा डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते? किंवा मी पदवीधर आहे मला नौकरी कुठे मिळेल? कसाही प्रश्न असो, विचारा. प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. शिक्षण आणि रोजगार या बद्दलची विविध माहिती इथे मिळेल आणि त्यात नियमित भर घातली जाईल; म्हणून पुन्हा भेट देत राहा किंवा तुम्हाल हव्या असलेल्या माहितीबद्दल सरळ विचारा, आम्हाला सहकार्य करण्यास नक्कीच आवडेल. तसेच आपल्याकडे आपण राबवत असेले काही उपक्रम असतील किंवा काही माहित असेल तर ती ही नक्की पाठवा, इथे त्या माहितीस प्रसिद्धी दिली जाईल.
>> संविधानाने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे केलेले आहे. >> सर्व शिक्षण अभियाना मोठ्या प्रमाणात शिक्षण क्रांती आणली जात आहे. यातील काही अटी अशा आहेत: 1)शाळा गाव पासून १ की.मी अंतराच्या आत असावी २) शाळेत त्यांना पुस्तके मोफत मिळवीत ३)तसेच ४० विद्यार्थ्यांमागे कमीत कमी एक शिक्षक असावाच तसेच इतर अनेक अटी समविष्ट आहेत. पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणात काही गैर सोय तर होत नाही ना या वर लक्ष द्यावे. त्याच्या शाळा हे सर्व नियम पाळतात की नाही याची चौकशी करावी. गावातील तरुणांनी शाळेतील कारभारावर लक्ष ठेवावे. ग्रामपंचायतीला गरज पडेल तेंव्हा संबंधित विषयावर जाब विचारावा. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष हा आजच्या काळात गुन्हाच ठरावा. मग गुन्हेगार शासन वा पालक का असेना. >>संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि गावातील नागरिकांनी ह्या शिक्षणा साठी ग्रामापांच्यात आणि शाळेकडे आग्रह धरावा. गावातील सुशिक्षित युवक खाजगी संगणक केंद्र ही चालवू शकतात, ज्याने त्यांना रोजगार ही मिळेल आणि संगणक ही गावात येईल, बँका या साठी कर्ज पुरवठा करतात. >> प्रत्येक वेळी शासनावर निर्भर न राहता गावाने मुलांच्या शिक्षणा साठी 'ग्राम-शिक्षण-मोहीम' राबवावी ज्यात, गावातील सुशिक्षित पालक सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा सुट्टीच्या वेळेत, शिक्षण आणि इतर विषयावर मार्गदर्शन करावे. याने गावातील शैक्षणिक वातावरण मुलांच्या संगठीत प्रगतीसाठी पोषक होते. >> नवीन रोजगाराच्या माहिती साठी भेट द्या: http://www.jijau.com/naukari
|
|